सोमवार, १९ सप्टेंबर, २०१६

कमालीची हतबलता, नैराश्य आणि अस्वस्थता...

काल मी जालना शहरात होतो. मूक मोर्चाची तयारी चालू होती. :मानवेंद्र काचोळे.


















आमचे मित्र विनय गुप्ते कोल्हापुरात असतात. त्यांनी मला एक टिपण पाठवले आहे. मला ते महत्त्वाचे वाटते. इथे पुन्हा मांडत आहे. 

हे आधी समजून घ्या.

1. शेतकर्‍याला शेतजमिनीची प्रचंड ओढ असते. 'काळी माय' ह्या श्ब्द्प्रयोगातून शेतजमीनी बरोबर असेलेल भावनिक नाते समजून घेता येते. शेती सोडून इतरत्र जाणे, इतर उद्योग करणे डोक्यातही येऊ शकत नाही इतके ते खोलवर गेलेलं बंधन आहे. अगदीच नाईलाज झाला, उपाशीच राहिला तर तो शेती सोडतो. शिकून शहरी नोकरी लागलेले चार पैसे मिळवून / काटकसर करून गावी शेतजमीन घेणे गौरवास्पद मानतात.

2. पुस्तकी ज्ञानाला फारसे महत्व न देणार्‍या शेती आधारित अर्थव्यवस्थेत स्वातंत्र्‍यानंतर शिक्षणाचा प्रसार अत्यंत चुकीच्या पद्धतीने झाला. शहरी मनसिकतेने तयार केलेले शैक्षणिक अभ्यासक्रम ह्या वर्गातील मुलांना सहज पचनी पडेनात त्यामुळे शिक्षण न घेणे, कॉप्या करून पास होणे नेहमीचे झाले.

3. शेतीत शिक्षणाचा थेट फायदा होत नाही, उलट शिकला तर शेतात उतरायाची लाज वाटते हा समज आपुर्‍या महितीमुळे माध्यमक्रांती होईपर्यन्त मजबूत होता. गेल्या वीस/पंचवीस वर्षातील माध्यमक्रांती आता शिक्षणाचे फायदे दाखवतेय पण शालेय शिक्षणाचे वय ओलांडून गेलेल्यांना (20 ते 45 वयोगट) आता काय आणि कसे शिकू ह्याचा गोंधळ आहे.

4. गेल्या वीस वर्षात नव्या आर्थिक धोरणांमुळे वाढलेल्या रोजगाराचा फायदा शेती व्यवसाय करणार्‍या कुटुंबांना फारसा झालेला नाही. कारण त्या संधीचा फायदा घेणारे शिक्षण/तांत्रिक ज्ञान मिळवण्याची परंपरा नाही.

5. शिक्षणामुळे आणि आरक्षणमुळे मिळणार्‍या संधि पाहून पुढे गेलेल्या तथाकथित खालच्या जातीतील अधिकारी महसूल पोलिस आदि सरकारी खात्यांमध्ये असल्याने व व अट्रोसिटी कायद्याने गावगाड्यावरील तथाकथित पकडही ढिली होऊ लागली. सत्ता दुरावत गेली.

5. गावातील शेतीव्यवसायावर अवलंबून असलेल्या इतर घटकातील (अलूते/बलुते) लोकांना तांत्रिक ज्ञान मिळवण्याच्या परंपरेने नव्या संधींचा थेट फायदा झाला. त्यांनी गाव/शेतीसंबधित उद्योग गुंडाळून ठेऊन शहराकडे धाव घेतली, घेऊ शकले.

6. गेल्या वीस वर्षातील त्यांची भरभराट गावात पक्के घर बांधणे, सणसुदीला गाडीतून गावी येणे आदि रूपानी गावातले शेती करणारे/ शेतीस चिकटून राहणारे पहात राहिले. त्यांच्या प्रगतीने अस्वस्थ होत राहिले.

7. दिल्ली वा राज्यस्तरावरील सत्ताधार्‍यांची भाषा वेगळी आहे, शेतीप्रधान जीवनाच्या कैक कोस दूर आहे हे गोहत्या प्रतिबंधक कायद्यासारख्या कायद्यातून ह्यांना जाणवू लागले. असले हास्यास्पद निर्णय घेणारे सरकार शेतकर्‍यांचे काय भले करणार ही भाषा त्यांना पटू लागली. कारण भाकड जनावराच्या कातड्याचे हजार दोन हजार त्याला मिळेनासे झाले.

ह्या सार्‍यांमुळे कमालीची हतबलता, नैराश्य आणि अस्वस्थता लाखोंच्या संख्येने कोणत्याही झेंड्याशिवाय, नेतृत्वाशिवाय सहज शांतपणे एकत्र येतेय. पूर्वग्रहदूषित उपाय ह्यावर उपयोगाचे नाही. ह्यांना आधी समजून घ्या.

1 टिप्पणी:

  1. राखीव जागा रद्द करू ,atrocity रद्द करू ,अल्पसंख्य लोकांचा बंदोबस्त करू ई आश्वासने देवून सत्तेत आलेल्या भाजप व शी सेनेने जे पेरले तेच उगवते आहे .शेतकर्यांना बकालपणा बहाल करणारे नकोच असे जन मत झाल्यामुळे प्रचंड मोर्चेबांधणी यशस्वी होते आहे .

    उत्तर द्याहटवा