
एकदा एका दवाखान्यात आजीबाई भेटल्या. अपघातात आजोबांना मार लागला होता.गावात ट्रक्टर मागे घेत असतांना मागे उभ्या असलेल्या आजोबांना मार लागला. पडले. बरगड्यांना दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात आणले होते. त्यांच्या उपचाराबद्दल चर्चा चालू होती. दवाखान्यातील काम करणारी काही कामगार मुले आजीच्या ओळखीची असावीत. मुले पुन्हापुन्हा आजीला चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार कर, त्याच्याकडून आपण पैसे वसूल करू असे सांगत होते. निदान त्याचेकडून उपचाराची तरी तजवीज करू असा आग्रह करीत होते. आजी त्यांना पुन्हा पुन्हा ड्रायवर ची काही चूक नाही, त्यांनी मुद्दाम अंगावर घातली नाही, त्याच्या काय पाठीला डोळे आहेत काय? चूक यायचीच होती,यायचेच लक्ष नव्हते, असे सांगत होत्या. चालक कसा भला माणूस आहे, त्यांनी कसे यायला इथवर आणले सांगत होत्या. शेवटी म्हणाल्या, त्याची काईच चूक नाही. नशीब आपल थोड्या दुखापतीवर निभल. मी त्याच्याकडून काहीच मागणार नाही. आन पोराहो तुम्ही बी काई मागू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा